आता निर्णयाक लढाई, गाफील राहू नका दगा फटका होईल - मनोज जरांगे
29-08-2026
मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठीचं आमरण उपोषण आज पासून अंतरवाली सराटीत सुरू झाला आहे.. यामुळे मराठा आरक्षणावरून राज्याचे राजकारण चांगलंच तापलं.. यावेळी मराठी बांधवांना आवाहन करत मनोज जरांगे म्हणाले की, आता शेवटची लढाई, गाफील राहू नका, दगा फटका होण्याची शक्यता अशी भीती त्यांनी व्यक्त केली. वर्षा बंगला सगळ्यांचा आहे, मागण्या मान्य न झाल्यास मुंबई गाठणार. फडणवीस साहेब मोकळ्या मनाचा माणूस आहेत पण जरा चिंगूस ही आहेत, असा टोलाही लगावला. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोड येथे छत्रपती संभाजी नगर ते जळगाव या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ओबीसींचा नामोनिशाण मिटवण्याचा काम सुरू असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. यामुळे राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते ही आक्रमक झाले आहेत.
राहुल गांधी यांचा भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेवर हल्लाबोल
29-08-2026
आज देशात दोनच विचारधारांची लढाई आहे. एकीकडे भाजप आणि आरएसएसची मनुस्मृति आणि दुसरीकडे भारताचे संविधान. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंड मधील हलदवानी येथील रामलीला मैदानावर भाषण केलेलं... आणि त्यानंतर काही लोकांनी तिथे शुद्धीकरण केलं. त्यापैकी एक गिरीश पांडे व्यक्ती होता जो की आरएसएसचा सदस्य आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. झालेल्या घटनेला उत्तराखंड भाजपचे प्रवक्ते महेंद्र भट यांनी याला समर्थन दिल... हे सरळ सरळ, अस्पृश्यता आहे... अस्पृश्यतेला आपल्या संविधानात गुन्हा म्हटलं गेलंय. त्यामुळे ज्यांनी शुद्धीकरण केलं त्यांच्यावर एफ आय आर करा ही आमची प्रमुख मागणी आहे... आज या घटनेला वीस दिवस झाले, तरी कोणतीही कारवाई केली गेली नाही. या सर्व प्रश्नांवर मोदीजी मौन बाळगून आहेत कारण ते त्याच विचारधारेचे आहेत. आणि आजही भारतभरात विशेषता उत्तर भारतात अस्पृश्यता पाळली जाते, असे करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे. भाजप आरएसएस ला वाटत नाही की, या देशातील दलितांनी सन्मानाने, आदराने राहावं किंवा यशस्वी व्हावं.
एकाही विद्यार्थ्याचा जीव जाता कामा नये हायकोर्टाचा सरकारला इशारा
29-08-2026
पुण्यात गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. आंदोलनात एकाही विद्यार्थ्याचा जीव जाता कामा नये, असा थेट इशारा देत हायकोर्टाने उपोषणकर्त्यांना तातडीने योग्य वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
दरम्यान, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यातील आदिवासी विद्यार्थी शिष्टमंडळाची सकारात्मक बैठक झाली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या असून सायंकाळी पुण्यात जाऊन उपोषण सोडवले जाणार आहे.
मागण्यांमध्ये 12,500 रिक्त पदांवर मूळ अनुसूचित जमातीतील पात्र उमेदवारांची तात्काळ भरती करावी, बिंदू नामावली पूर्ववत करणे आणि व्हॅलिडीटी प्रक्रियेत तातडीने सुधारणा करण्याचा समावेश आहे. प्रशासकीय आश्वासनांनंतर विद्यार्थ्यांनी राहुल गांधी आणि आमदार रोहित पवार यांचे विशेष आभार मानले. परंतु, अधिकृत लेखी आदेश हातात मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्यावर आंदोलक विद्यार्थी ठाम आहेत.
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा
28-08-2026
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज सोळावा दिवस आहे. राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रोकी गुंज कार्यक्रमात, एका आदिवासी विद्यार्थिनीने तिच्या मागण्या मांडल्या आणि तिथूनच आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन मेन स्ट्रीम मध्ये चर्चेत आलं. सरकारने, विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत, यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन मागं घ्यावं अशी विनंती आदिवासी विकास मंत्री अशोक उकई केलेली. व पण जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. आणि यावरूनच भाजपने राहुल गांधींवर जोरदार टीका केली. काँग्रेस स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधींचा करिअर आणि काँग्रेस नेत्यांच्या मुला मुलींचं करिअर घडवण्यासाठी काँग्रेस आदिवासी विद्यार्थ्यांवर आंदोलन सुरू ठेवण्याचा दबाव टाकत आहे असा थेट आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या लिखित चौकटीत कधी येतील याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आहे.
नेपाळमधील महापुरात ५३८ हून जास्त मृत्यू ; पुन्हा पुराचा धोका कायम, १४०० नागरिक बेपत्ता
28-08-2026
नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर हिमनग कोसळल्याने आलेल्या भीषण महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५३८ वर पोहोचली आहे. आपत्कालीन पथकांनी आतापर्यंत ४८२ मृतदेह बाहेर काढले असून अद्याप १४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. यामध्ये अनेक भारतीय पर्यटकांसह जगभरातील परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
दरम्यान, भूस्खलनामुळे नदीच्या वरच्या भागात तयार झालेल्या दोन कृत्रिम तलावांमधील पाण्याची पातळी धोकादायकरीत्या वाढल्याने दुसऱ्या टप्प्यातील पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हे तलाव पूर्णपणे रिकामे होईपर्यंत पुराची टांगती तलवार कायम राहील, असा इशारा नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.
या आपत्तीचा फटका तब्बल ९० हजारांहून अधिक लोकांना बसल्याचा अंदाज रेडक्रॉसने वर्तवला आहे. पुरामुळे रस्ते वाहून गेल्याने मदत साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठे अडथळे येत आहेत. आतापर्यंत ८५ भारतीयांसह सुमारे ११७ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून शोध व बचावकार्य अद्यापही युद्धपातळीवर सुरू आहे.