img


Subscribe on:

Latest Podcast

podcast1
अशी सुटेल सीमाप्रश्नाची कोंडी : डॉ. दीपक पवार

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न गेली 70 वर्षे प्रलंबित आहे. अलीकडच्या काळात सीमाप्रश्नाच्या विषयी मराठी भाषिकांची आंदोलने होतात खरी परंतु हा आता उपचाराचा भाग राहिला आहे. तब्बल 22 वर्षे झाली या वादाची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. तारीख पे तारीख असा त्याचाही सिलसिला सुरू आहे. वास्तव म्हणजे अगदी केंद्र सरकार पासून राज्य सरकारपर्यंत या प्रश्नाबाबत सर्वांचीच उदासीनता दिसत असून सीमा प्रश्नाचे एक ज्येष्ठ अभ्यासक डॉ. दीपक पवार यांनी याविषयी मांडलेले परखड विचार.. #DrDeepakPawar #DrShriramPawar #MaharashtraDharm #Marathikaran #Marathi #Fedaralism #LanguagePolitics #Migration #Sakalaam #BaatSeBaatChale

podcast1
मुश्रीफांच्या पाठोपाठ चंद्रकांतदादा टार्गेट ? भाजप नेत्याची खदखद

सध्या गोकुळ निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि या वाऱ्यात महायुतीच्या गोटातून एक मोठा राजकीय स्फोट झाला आहे. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी असा काही बॉम्ब फोडलाय की ज्यामुळे महायुतीच्या नेत्यांची झोप उडाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत आमदार शिवाजीराव पाटील यांनी महायुतीतील 'घराणेशाही', नेत्यांची 'मनमानी' आणि आपल्याला दिली जाणारी 'दुय्यम वागणूक' यावर जाहीर संताप व्यक्त केला आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे, 'जर आम्हाला इथे सन्मान मिळत नसेल, तर आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील हे काय आमचे वैरी नाहीत,' असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. नेमकं घडलंय काय? बैठकीत असं काय झालं की शिवाजीराव भडकले? हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत दादांवर त्यांचा एवढा राग का आहे? आणि गोकुळच्या आखाड्यात सतेज पाटलांसोबत खरोखरच नवी युती होणार का? या सर्व प्रश्नांचा आढावा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत. #GokulElection2026 #MushrifShivajiravPatil #SatejPatil #ChabdrakantDadaPatil #SamitKadam #satejpatil #buntypatil #chandrakantpatil #samitkadam #shivajipatil #mahadevmahadik #gokulelection #buntypatil #prakashabitkar #hasanmushrif #sakalamnews #sakalaam #gokulmilk

ताज्या घडामोडी

आता निर्णयाक लढाई, गाफील राहू नका दगा फटका होईल - मनोज जरांगे

29-08-2026

मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठीचं आमरण उपोषण आज पासून अंतरवाली सराटीत सुरू झाला आहे.. यामुळे मराठा आरक्षणावरून राज्याचे राजकारण चांगलंच तापलं.. यावेळी मराठी बांधवांना आवाहन करत मनोज जरांगे म्हणाले की, आता शेवटची लढाई, गाफील राहू नका, दगा फटका होण्याची शक्यता अशी भीती त्यांनी व्यक्त केली. वर्षा बंगला सगळ्यांचा आहे, मागण्या मान्य न झाल्यास मुंबई गाठणार. फडणवीस साहेब मोकळ्या मनाचा माणूस आहेत पण जरा चिंगूस ही आहेत, असा टोलाही लगावला. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोड येथे छत्रपती संभाजी नगर ते जळगाव या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ओबीसींचा नामोनिशाण मिटवण्याचा काम सुरू असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. यामुळे राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते ही आक्रमक झाले आहेत.

राहुल गांधी यांचा भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेवर हल्लाबोल

29-08-2026

आज देशात दोनच विचारधारांची लढाई आहे. एकीकडे भाजप आणि आरएसएसची मनुस्मृति आणि दुसरीकडे भारताचे संविधान. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंड मधील हलदवानी येथील रामलीला मैदानावर भाषण केलेलं... आणि त्यानंतर काही लोकांनी तिथे शुद्धीकरण केलं. त्यापैकी एक गिरीश पांडे व्यक्ती होता जो की आरएसएसचा सदस्य आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. झालेल्या घटनेला उत्तराखंड भाजपचे प्रवक्ते महेंद्र भट यांनी याला समर्थन दिल... हे सरळ सरळ, अस्पृश्यता आहे... अस्पृश्यतेला आपल्या संविधानात गुन्हा म्हटलं गेलंय. त्यामुळे ज्यांनी शुद्धीकरण केलं त्यांच्यावर एफ आय आर करा ही आमची प्रमुख मागणी आहे... आज या घटनेला वीस दिवस झाले, तरी कोणतीही कारवाई केली गेली नाही. या सर्व प्रश्नांवर मोदीजी मौन बाळगून आहेत कारण ते त्याच विचारधारेचे आहेत. आणि आजही भारतभरात विशेषता उत्तर भारतात अस्पृश्यता पाळली जाते, असे करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे. भाजप आरएसएस ला वाटत नाही की, या देशातील दलितांनी सन्मानाने, आदराने राहावं किंवा यशस्वी व्हावं.

एकाही विद्यार्थ्याचा जीव जाता कामा नये‌ हायकोर्टाचा सरकारला इशारा

29-08-2026

पुण्यात गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. आंदोलनात एकाही विद्यार्थ्याचा जीव जाता कामा नये, असा थेट इशारा देत हायकोर्टाने उपोषणकर्त्यांना तातडीने योग्य वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
दरम्यान, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यातील आदिवासी विद्यार्थी शिष्टमंडळाची सकारात्मक बैठक झाली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या असून सायंकाळी पुण्यात जाऊन उपोषण सोडवले जाणार आहे.
मागण्यांमध्ये 12,500 रिक्त पदांवर मूळ अनुसूचित जमातीतील पात्र उमेदवारांची तात्काळ भरती करावी, बिंदू नामावली पूर्ववत करणे आणि व्हॅलिडीटी प्रक्रियेत तातडीने सुधारणा करण्याचा समावेश आहे. प्रशासकीय आश्वासनांनंतर विद्यार्थ्यांनी राहुल गांधी आणि आमदार रोहित पवार यांचे विशेष आभार मानले. परंतु, अधिकृत लेखी आदेश हातात मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्यावर आंदोलक विद्यार्थी ठाम आहेत.

पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा

28-08-2026

पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज सोळावा दिवस आहे. राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रोकी गुंज कार्यक्रमात, एका आदिवासी विद्यार्थिनीने तिच्या मागण्या मांडल्या आणि तिथूनच आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन मेन स्ट्रीम मध्ये चर्चेत आलं. सरकारने, विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत, यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन मागं घ्यावं अशी विनंती आदिवासी विकास मंत्री अशोक उकई केलेली. व पण जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.‌ आणि यावरूनच भाजपने राहुल गांधींवर जोरदार टीका केली. काँग्रेस स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधींचा करिअर आणि काँग्रेस नेत्यांच्या मुला मुलींचं करिअर घडवण्यासाठी काँग्रेस आदिवासी विद्यार्थ्यांवर आंदोलन सुरू ठेवण्याचा दबाव टाकत आहे असा थेट आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या लिखित चौकटीत कधी‌ येतील याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आहे.

नेपाळमधील महापुरात ५३८ हून जास्त मृत्यू ; पुन्हा पुराचा धोका कायम, १४०० नागरिक बेपत्ता

28-08-2026

नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर हिमनग कोसळल्याने आलेल्या भीषण महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५३८ वर पोहोचली आहे. आपत्कालीन पथकांनी आतापर्यंत ४८२ मृतदेह बाहेर काढले असून अद्याप १४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. यामध्ये अनेक भारतीय पर्यटकांसह जगभरातील परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
दरम्यान, भूस्खलनामुळे नदीच्या वरच्या भागात तयार झालेल्या दोन कृत्रिम तलावांमधील पाण्याची पातळी धोकादायकरीत्या वाढल्याने दुसऱ्या टप्प्यातील पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हे तलाव पूर्णपणे रिकामे होईपर्यंत पुराची टांगती तलवार कायम राहील, असा इशारा नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.
या आपत्तीचा फटका तब्बल ९० हजारांहून अधिक लोकांना बसल्याचा अंदाज रेडक्रॉसने वर्तवला आहे. पुरामुळे रस्ते वाहून गेल्याने मदत साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठे अडथळे येत आहेत. आतापर्यंत ८५ भारतीयांसह सुमारे ११७ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून शोध व बचावकार्य अद्यापही युद्धपातळीवर सुरू आहे.


अजून पहा
img
कामात आहात? प्रवासात आहात?

आमचे पॉडकास्ट ऑडिओ स्वरुपात ऐका...

आमच्या Spotify channel ला सबस्क्राईब करा किंवा थेट क्लिक करून ऐका

आमचे नवीन पॉडकास्टस पाहा

आमचे सर्व पॉडकास्टस

असंख्य घटनाच्या कल्लोळातून आपल्या जगण्यावर परिणाम घडवणाऱ्या घटना घडामोडींची चिकित्सा करणारं पॉडकास्ट!

एक अशी संवादमालिका जिथं पुस्तक फक्त वाचलं जात नाही तर ते अनुभवलं जात! या पॉडकास्टमध्ये आम्ही भेटणार आहोत त्या लेखकांना, अनुवादकांना, संपादित करणाऱ्यांना ज्यांची शब्दांनी विचारांना नवी दिशा दिली.

जगभरात घडणाऱ्या. लक्ष वेधून घेणाऱ्या परिणामकारक घटनांचा वेध दर आठवड्याला श्रीराम पवार यांच्या नजरेतून पाहायला विसरु नका

Enjoy New Shows

Latest episodes

img
List of Episodes

Listen Our Podcosts On Go!

Our Testimonals

Reviews from users

imng
imng
imng
img

अतुलनीय संवाद आणि प्रेरणादायक विचार! ह्या पॉडकास्ट ने मला नवीन विचार देणारे आणि जीवनावर नवा दृष्टिकोन आणले.

पर्णा देशमुख
img
img

खूपच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक आहे. हे पॉडकास्ट नेहमीच वेगळ्या दृषटिकोनातून विचार मांडतात.

रोहन पटेल
img
img

माझ्या दैनंदिन आयुष्यात नवा उत्साह भरला आहे. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी खूप शिकले.

दीक्षा शर्मा
img
img
img img
David Michale Episode 13
Previous track button
Large toggle button
Next track button
00:00 / 00:00